Friday, May 15, 2015

मन उधाण वाऱ्याचे

Add caption

मार्च एप्रिल महिन्यापासनं जंगलाच्या सभोवताल पळस बहरलाय. जंगलात प्रवेश करण्याच्या  भरपूर आधी प्रवासातच हा वाटेकरी आपले स्वागत करत अन रंगांची उधळण करत आयुष्य कसं जगावं ह्याची शिकवण देताना दिसून येतो. किती दिवसांचंच ते बहरणं पण वर्षभर हया सौंदर्याची उधळण डोळ्यात साठवून असते.

मनात येतं, आपल्याला असं  आयुष्य जगता येईल ? स्वतः कडे जे जे काही आहे ते ते सगळं उधळून टाकायचं आणि रिती झोळी घेऊन तटस्थपणे जीवनाकडे बघायचं.

परमेश्वराकडे काही मागावंसं वाटलं तर असं आयुष्य जगण्याची कला अंगी दे आणि तसं करण्याचं बळ दे, एवढंच मी मागेन.

Sunday, February 8, 2015

राधिका

तुम बिन हथेली की हर लकीर प्यासी है !
तीर पार कान्हा से दूर राधिका-सी है !!

श्याम की उदासी में याद संग खेला है !
कुछ गलत न कर बैठे मन बहूत अकेला है  !!

औषधी चली आओ चोट का निमंत्रण है !
बासूरी चली आओ होठ का निमंत्रण है !!

कुमार विश्वासची ही रचना आहे बहुतेक. ओळी वाचताना डोळ्यात खोल कुठेतरी संध्याकाळचा एखादा प्रसंग आठवतो आणि आपण कुठेतरी खोल शून्यात हरवतो.

एखाद्या सांजवेळी कशासाठी, कोणासाठी आणि आणखी किती दिवस असे अनेक प्रश्न मनात डोकावू लागतात. आपण जे कार्य हाती घेतले आहे ते करताना कधी खरंच एकाकी वाटायला लागतं आणि अशा कवितेच्या ओळी मदतीला धावून येतात.